महाअधिवेशनानंतरची काँग्रेस
post-general congress
X
पुणे येथील कस्बा मतदारसंघ आणि पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले. हे अशावेळी जेव्हा भारत जोडो यात्रेनंतर रायपूर येथे काँग्रेसचे महाअधिवेशन झाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा हा विजय त्यांचे मनोबल वाढवणारा ठरणार आहे. पुणे आणि पश्चिम बंगालमधील दोन्ही जागांचे आपले महत्त्व आहे. कस्बापेठेत गेल्या 28 वर्षांपासून भाजपाचा उमेदवार जिंकत राहिला. हा भाजपाचा बालेकिल्ला होता. त्याच प्रकारे पश्चिम बंगाल मधील मुर्शिदाबाद मतदार संघात तृणमुल काँग्रेसचे वर्चस्व होते. येत्या 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पाठबळ वाढवण्यासाठी एवढ्या दोन पोटनिवडणुकीतील विजय काँग्रेससाठी वरदान आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे? याचे कारण असे की जर भारत जोडोने काँग्रेसला संजीवनी दिली असेल तर ईशान्य राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव कशामुळे झाला; कारण त्या राज्यांमध्ये एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व होते. तिथे बाहेरून गेलेल्या पक्षांना राष्ट्रवादी आणि रामदास आठवले यांच्या पक्षाचे उमेदवार जिंकून आले. राष्ट्रवादीला सात जागा तर आठवले गटाला दोन जागा मिळाल्या. ममता बॅनर्जी यांच्या पक्षानेसुद्धा जागा जिंकल्या आहेत. टक्केवारी पाहता काँग्रेसला 3.25 टक्के तर राष्ट्रवादीला 9 टक्के मते मिळाली आहेत.
नुकतेच रायपूरमध्ये जे अधिवेशन झाले त्यात असा ठराव पारित करण्यात आला की काँग्रेस पक्ष समविचारी पक्षांसोबत काम करायला तयार आहे. पण तसे म्हणतानाच ही देखील अट घातली की संयुक्त पुरोगामी आघाडी सारखी आघाडी करावी लागेल. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत संयुक्त आघाडी करून काँग्रेसने निवडणूक जिंकली होती पण इतर पक्षांना या आघाडीचे नेतृत्व देण्यात आले नव्हते. मनमोहनसिंह यांना पंतप्रधान केले होते तर संपुआच्या अध्यक्षपदासाठी स्वतः सोनिया गांधी होत्या. जर संपुआच्या धर्तीवर येत्या लोकसभा निवडणुकीत सामोरे जाण्याचे ठरले तर इतर पक्ष सोनिया गांधी किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांना नेतेपद तसेच पंतप्रधानपद देण्यास मान्य करतील का? काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करताना असे म्हटले आहे की, जर तीसरी कोणती आघाडी केली तर याची भाजपालाच मदत होणार म्हणजे ते संपुआ शिवाय इतर कोणती आघाडी करणार नाही. तसेच याचे नेतेपद काँग्रेसकडेेच असणार? मग इतर समविचारी पक्षांसोबत जाण्यास काँग्रेस तयार आहे असे म्हणण्यात काय अर्थ?
खरे पाहता काँग्रेस पक्षाच्या अहंकाराने पक्षाला इतक्या दयनीय परिस्थिती पर्यंत आणून सोडले आहे. मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर किंवा त्यापुढे जेव्हा व्ही.पी.सिंह यांना दिवंगत पंतप्रान राजीव गांधीवर भ्रष्टाचाराचे आरोप लावून काँग्रेसची सत्ता निवडणुकीद्वारे खेचून घेतली आणि व्हिपी सरकारला पाठिंबा देणाऱ्या भाजपाने राममंदिराच्या मुद्यावर आपला पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर मग मंडल आयोगाच्या चळवळीने राजकारणाचे स्वरूप बदलले. भाजपाने हिंदुत्वाची विचारधारा अंगीकारली. बहुजणांनी आपल्या राज्यात नवे पक्ष निर्माण केले. या नव्या पक्षांशी भाजपाने आपली विचारधारा ना सोडता आघाडी केली. पण काँग्रेस पक्षाने ते पक्ष समविचारी असताना देखील त्यांची साथ घेण्यास आणि त्यांना आपल्या बरोबर आणण्यास काही तडजोड केली नाही. आपल्या राष्ट्रीय पातळीवरील सर्वात महान पक्ष असण्याच्या गर्व सोडला नाही.
भाजपाने सर्व प्रकारच्या लहान मोठ्या प्रांतिक पक्षांशी हातमिळवणी केली आणि सर्वांची साथ घेतली. नंतरच्या निवडणुकीत भाजपाने केंद्राची सत्ता ताब्यात घेतली. इथून भाजपाचे अच्छे दिन सुरू झाले आणि काँग्रेसचे बुरे दिन सुरू झाले. अटलबिहारी आणि लालकृष्ण आडवाणी यांनी भाजपाला लहानाचे इतके मोठे केले की काँग्रेसपुढे त्याचे आव्हान उभे केले. याच काळात आम आदमी पक्षाचा उदय झाला आणि त्याने दिल्लीलाही काँग्रेसकडून खेचून घेतले. काँग्रेस पक्षाचा हाच राजकीय अहंकार आजही कायम आहे. इतर पक्षांबरोबर काम तर करायचे आहे पण त्यांना नेतृत्वात वाटा द्यायचा नाही. परिणामी, तृणमुल, आप, टीआरएस, आंध्रप्रदेश मधील जगन रेड्डी हे सगळे पक्ष काँग्रेसशी हात मिळवणी करण्यास तयार नाहीत. गंमत अशी की, ह्या सर्व पक्षांचे संस्थापक काँग्रेस मधूनच बाहेर पडलेले आहेत. पक्षात असताना त्यांना किंमत दिली गेली नाही. त्यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेस बरोबरीचे नव्हे तर काही प्रमाणात मोठेच झाले. ममता बॅनर्जी, शरद पवार, जगन रेड्डी ह्या सर्वांनी काँग्रेसच्याच तालमित राजकारणाचे प्रशिक्षण घेतलेले. आज काँग्रेसपुढचे आव्हानच नव्हे तर संकट बणून उभे आहेत.
नितीषकुमार यांनी भाजपाशी आघाडी सोडली आणि पुन्हा लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाची साथ घेत आहेत. महागठबंधन बनवणाऱ्या अखिलेशच्या समाजवादी पक्षाने तसेच बसपाने काँग्रेसचा उघड विरोधही केला नाही की संपुआच्या काँग्रेसच्या प्रस्तावाला संमती दिली नाही. राष्ट्रवादी आणि द्रमुक काँग्रेस बरोबर जायला सध्या तरी तयार आहेत. नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांनी काँग्रेसला जे काही करायचे ते लवकर करा असे वारंवार सांगत आहेत. पण काँग्रेसकडून त्यांना कोणतेही उत्तर दिलेले नाही. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (एमएल)चे महासचिव दिपंकर भट्टाचार्य यांनी असे आवाहन केले आहे की गुजरात मॉडल किंवा बिहार मॉडल पैकी कोणते तरी एक निवडा आणि प्रतिसाद द्या पण काँग्रेस पक्षाने काहीही म्हटले नाही. काँग्रेस पक्षाने असे जाहीर केले आहे की, राहुल गांधी यांच्या यात्रेचा निवडणुकांशी संबंध नाही तर दुसरीकडे त्या यात्रेद्वारे काँग्रेस पक्षाला किती राजकीय फायदा झाला असे म्हणतानाही चुकत नाही. संभ्रमाची परिस्थिती आहे. काँग्रेस पक्षाने वारंवार आपली विचारधारा जाहीर केली ती म्हणजे लोकशाही आणि स्वातंत्र्य याच विचारधारेवर ते पक्ष निवडणुका लढणार. दुसरीकडे भाजपाचीही एकमेव विचारधारा आहे ती म्हणजे काहीही करून निवडणुका जिंकणे ते वर्षभर निवडणुकांच्या विचारात मग्न असते ही विचारधारा कुठे कमी पडलीच तर मग राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षा आणि 5 किलो अन्नधान्य समीकरणात काँग्रेस पक्षाच्या लोकशाही विचारधारा स्वातंत्र्य टिकू शकत नाही. कारण राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आला की नागरिकांची अशी समज होते की आपण असुरक्षित आहोत. सुरक्षेपलिकडे त्यांना कोणते स्वातंत्र्य किंवा लोकशाही काही नको असते.
अशा परिस्थितीत जर 2024 च्या निवडणुका देखील भाजपाने जिंकल्या तर ते काँग्रेस पक्षाच्या सौजन्याने असणार हे खरे.
काँग्रेसचे मुस्लिम भावनांकडे दुर्लक्ष...
रायपूर येथील जे काँग्रेसचे महाअधिवेशन झाले त्यामध्ये काँग्रेसमधील मुस्लिम नेत्यांशी असा काही व्यवहार केला जसे की त्यांचे अस्तित्वच या देशात नाही काँग्रेसमध्ये तर नाहीच नाही. वर्तमानपत्रांमध्ये जे एक पानी जाहिरात दिले गेले त्यात एकही मुस्लिम नेत्यांचा समावेश नव्हता. मौलाना अबुल कलाम आझाद यांचेही छायाचित्र दिले नव्हते. इतकेच नव्हे तर उर्दूभाषी समाचार पत्रांमध्ये तर जाहीरात सुद्धा देण्यात आली नाही. कमलनाथ धीरेंद्र शास्त्रीच्या चरणी जातात म्हणजे आपणही धार्मिक असल्याचे जगजाहीर करायला. मुस्लिमांविषयी हा जो सवतीच्या लेकरासारखा व्यवहार करण्यात आला त्याचे कारण काय हे त्यांचे त्यांनाच माहित. जयराम रमेश म्हणतात याची चौकशी केली जाईल. चौकशी करण्याइतकी गुपित ही माहिती नाही. ते काँग्रेस मीडियाचे प्रभारी असून सुद्धा जर त्यांना चौकशी करावी लागत असेल तर हे कुणाला मुर्ख बनविण्याचे प्रयत्न आहेत. काँग्रेसमधील नेते भाजपाशीसहानुभूती बाळगत त्यांच्या आणि भाजपाच्या धार्मिक आणि राजकीय भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून मुस्लिमांशी असा व्यवहार केला गेला असेल? कदाचित, असो त्यांचे त्यांनाच माहित. नासेर आणि जुनैदची जी हत्या करण्यात आली त्याविषयी काँग्रेस पक्षाने साधे ट्विट सुद्धा केले नाही. असेच काही अख्लाकच्या हत्येवेळी घडले होते. राहुल गांधी अखलाकच्या नातेवाईकांना भेटू इच्छित होते पण काँग्रेस नेत्यांनी त्यांना रोखले. कारण तेच धार्मिक भावना आहत होता कामा नयेत. जाणून बुजून किंवा अजानतेपणाने काँग्रेस तेच काही करत आहे. जे भाजपाला अभिप्रेत आहे. गांधी परिवाराचे काँग्रेस पक्षावरील वर्चस्व त्याला मान्य नव्हते आणि म्हणून राहुल गांधी आणि सोनिया गांधी पक्षापासून दूर गेले. मुस्लिमांना राजकारणापासून दूर ठेवा हे देखील भाजपाचा सर्व पक्षांना राजद असो की, तृणमुल, आप की बाकीचे सारेपक्ष सगळ्या पक्षांनी मुस्लिमांना राजकारणापासून दूर ठेवण्याचे ठरवले आहे. त्याचेच पालन काँग्रेस पक्ष करत आहे. जोपर्यंत मतदार धार्मिक कारणावरून मतदान करतात, विचारधारा वगैरेकडे पाहत सुद्धा नाहीत तोवर सर्वकाही ठीक आहे आणि कोणतेही पक्ष म्हणूनच मुस्लिमांना आपला पाठिंबा उघडपणे कधीच सांगणार नाही हे वास्तव आहे. त्याचेच अनुसरण काँग्रेस पक्ष करत आहे. एवढी एकच गोष्ट.