- सहकार पॅनलचे राजुदास जाधव यांनी एकवीस वर्ष उपभोगली सत्ता यंदा मात्र मतदारांनी दिला रट्टा
- राजलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेने केला कर्मचाऱ्यावर अन्याय
- उमरची सुटका कराः नॉम चॉम्स्की, राजमोहन गांधींची मागणी
- गृह विलगीकरणातील रुग्णांवर विशेष लक्ष ठेवा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आता जिल्ह्यात घरोघरी लसीकरण मोहीम
- स्वप्नांना कष्ठाचे बळ द्या. - माजी नगरसेवक संजय कंचर्लावार भानापेठ प्रभाग क्र. ११ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप सोहळा संपन्न.
- उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उदि्दष्ट वाढविण्याचा राज्य शासनाचा निर्णय. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराचे फलीत. १५ जुलै पर्यंत धान खरेदी करण्याचे अभिकर्ता संस्थांना शासनाचे निर्देश.
- संभाव्य कोरोना लाटेचा धोका टाळण्यास करा लसीकरण - आयुक्त राजेश मोहिते १२ ते १७ वयोगटासाठी शाळांमध्ये केले जाणार लसीकरण
- शहरातील सायकल ट्रॅकच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशीच्या मागणीसाठी भाई अमन यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
- आपले घर डेंग्युमुक्त ठेवा आताच काळजी घेतली तर धोका टळेल मनपा प्रा.आरोग्य केंद्रात मिळणार गप्पी मासे
- राष्ट्रीय रँकिंग धनुर्विद्या स्पर्धेत मंजिरी अलोने ला सुवर्णपदक

सरकारला विजबिल माफ करता येत नसेल तरी महावितरण कंपनी द्वारा होत असलेली लुटतरी थांबवावी
X
केजरीवाल सरकार सारखं विजबील माफ जरी करणार नसले तरी या लाॕकडाऊन काळातल्या तिन महिण्याचे तरी विजबिल सरकार माफ करेल अशी जनतेला भाबळी आशा होती
जाकीर हुसैन (यवतमाळ): कोरोना महामारीच्या जागतिक संकटात तीन महिण्याच्या लाॕक डाऊन काळात विज वितरण कंपनीने रिडींग घेतले नाही. त्यामुळे विजबील सुद्धा पाठविले नाही. ज्यांना आनलाईन कळले, ज्यांच्याजवळ स्मार्ट फोन आहे अशा काही चार दोन टक्के लोकांना मागील महिण्याचं बिना रिडींगच अॕव्हरेज बील आलं असे म्हणतात. परंतु पंच्यान्नव टक्के जनतेला मागच्या तीन महिण्याच बिल माहितच नाही ग्रामीण भागात तर शंभर टक्के लोकांना आनलाईन विजबीलाची कल्पना नाही. त्यामुळे ते भरण्यात आले नाही. लाॕकडाऊनच्या काळात हाताला कामधंदा नसल्याने तसेही गरीब जनता भरु शकत नसती तेव्हा जनतेचा पहिला अधिकार हा होता की दिल्लीच्या केजरीवाल सरकार सारखं सर्व दिवसाचे विजबील माफ जरी करणार नसले तरी या लाॕकडाऊन काळातल्या तिन महिण्याचे तरी विजबिल सरकार माफ करेल अशी जनतेला भाबळी आशा होती. परंतु माफ करनं तर सोडाच पण तीन महिन्यात जेवढ विजबिल यायला पाहिजे त्यांच्या सातपट बिल आले. कारण तीन महिण्यानंतर रिडिंग नेले त्यामुळे शंभर तिनशे पाचशेच्या वर युनिट रिडींग गेल्याने ३ रुपये ऐवजी १० ते १२ रु. प्रतियुनिट रेट लावला इतर चार्ज वेगळेच त्यामुळे बिलाची रक्कम सातपट वाढून एक ते दोन हजारापर्यंत यायला पाहिजे ते पाच ते दहा हजारापर्यंत विजबिले आलेली आहे. त्यामुळे ही सर्हास जनतेची लुट आहे. रिडिंग न घेणे व विजबिल न पाठवणे ही महावितरण कंपनीची चुक आहे. जसे रिडिंग न घेता आनलाईन अॕव्हरेज बिल दिले म्हणतात त्याचप्रमाणे तिन महिण्याच एकूण वापरलेले युनीट प्रत्येक महिण्याचे अॕव्हरेज युनिट मध्ये विभागून त्याप्रमाणे रेट लावायला पाहिजे होता. परंतु तीन महिण्याच्या एकूण युनिट नुसार रेट लावला. त्यामुळे न भुतो न भविष्यती एवढे बिल फुगून आले. एवढ्या संकटकाळात इतके बिल कसे भरावे या विवंचनेत सगळी जनता असल्याचे दिसत आहे. सरकारला विजबिल माफ करता येत जरी नसेल तरी महावितरण कंपनी द्वारा होत असलेली ही लुटतरी सरकारने थांबवावी अशी जनतेची ओरड जनते कडून होत आहे..