- सहकार पॅनलचे राजुदास जाधव यांनी एकवीस वर्ष उपभोगली सत्ता यंदा मात्र मतदारांनी दिला रट्टा
- राजलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेने केला कर्मचाऱ्यावर अन्याय
- उमरची सुटका कराः नॉम चॉम्स्की, राजमोहन गांधींची मागणी
- गृह विलगीकरणातील रुग्णांवर विशेष लक्ष ठेवा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आता जिल्ह्यात घरोघरी लसीकरण मोहीम
- स्वप्नांना कष्ठाचे बळ द्या. - माजी नगरसेवक संजय कंचर्लावार भानापेठ प्रभाग क्र. ११ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप सोहळा संपन्न.
- उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उदि्दष्ट वाढविण्याचा राज्य शासनाचा निर्णय. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराचे फलीत. १५ जुलै पर्यंत धान खरेदी करण्याचे अभिकर्ता संस्थांना शासनाचे निर्देश.
- संभाव्य कोरोना लाटेचा धोका टाळण्यास करा लसीकरण - आयुक्त राजेश मोहिते १२ ते १७ वयोगटासाठी शाळांमध्ये केले जाणार लसीकरण
- शहरातील सायकल ट्रॅकच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशीच्या मागणीसाठी भाई अमन यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
- आपले घर डेंग्युमुक्त ठेवा आताच काळजी घेतली तर धोका टळेल मनपा प्रा.आरोग्य केंद्रात मिळणार गप्पी मासे
- राष्ट्रीय रँकिंग धनुर्विद्या स्पर्धेत मंजिरी अलोने ला सुवर्णपदक

शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची पाहणी करून पंचवीस हजार हेक्टरी मदत द्या....आ.भीमराव केराम
X
सोयाबीन,कापूस,मूग,उडीद पिकांचे प्रचंड नुकसान...
श्री क्षेत्र माहूर/ता.प्र.पदमा गिर्हे
मागील आठवड्यात किनवट माहूर तालुक्यातील सतत दहा ते बारा दिवस पावसाने झड लावली होती.यामुळे हातातोंडाशी आलेले मूग उडीद पिके उद्ध्वस्त झाले तर सोयाबीन पिवळे पडून तर कापसाला ‘मर’रोग लागल्याने झाडे जाग्यावर कोमेजून मरत आहेत.अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याची मागणी आ.भीमराव केराम यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे. त्या पत्राची एक प्रत कृषी मंत्री नामदार दादाजी भुसे यांनीदेखील पाठवण्यात आलेली आहे.
माहूर किनवट शेतकरी नेहमीच आसमानी व सुलतानी संकटाचा बळी ठरत असतो कधी आवर्षण तर कधी अतिवृष्टी अशा संकटाचा सामना करत असताना उरलीसुरली कसर खाजगी व्यापारी पूर्ण करतात अशा अवस्थेत नेहमी जगाचा पोशिंदा शेतकरी भरडला जातो. सध्या ही परिस्थिती काही वेगळे नाही. अनुकूल वातावरणामुळे खरीप पिके डोलत असताना मागील आठवड्यात सतत दहा ते बारा दिवस संततधार पाऊस पडल्याने हातातोंडाशी आलेले मूग,उडीद पिके उध्वस्त झाली तर सोयाबीन पिवळे पडले आहेत.कापसाची पिक अधिक प्रमाणात पाणी झाल्याने ‘मर’ रोगाचे शिकार बनून जागेवरच कोमजुन मरत आहे. आधीच कोरोना महामारी च्या संसर्गामुळे आणि लॉक डाऊन मुळे शेतकरी पुरते अडचणीत आले होते. त्या परिस्थितीतून सावरत नाही तर सततच्या पावसामुळे पिकाची मोठी हानी झाल्याने किनवट माहूर तालुक्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या संकटात सापडलेला आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावरून प्रत्यक्ष पाहणीचे आदेश देऊन हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान मंजूर करण्याची कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्याची मागणी किनवट माहूर चे आमदार भीमराव केराम यांनी केली आहे.या निवेदनाची प्रत कृषी मंत्री ना.दादाजी भुसे यांना देखील पाठवण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.