- सहकार पॅनलचे राजुदास जाधव यांनी एकवीस वर्ष उपभोगली सत्ता यंदा मात्र मतदारांनी दिला रट्टा
- राजलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेने केला कर्मचाऱ्यावर अन्याय
- उमरची सुटका कराः नॉम चॉम्स्की, राजमोहन गांधींची मागणी
- गृह विलगीकरणातील रुग्णांवर विशेष लक्ष ठेवा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आता जिल्ह्यात घरोघरी लसीकरण मोहीम
- स्वप्नांना कष्ठाचे बळ द्या. - माजी नगरसेवक संजय कंचर्लावार भानापेठ प्रभाग क्र. ११ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप सोहळा संपन्न.
- उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उदि्दष्ट वाढविण्याचा राज्य शासनाचा निर्णय. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराचे फलीत. १५ जुलै पर्यंत धान खरेदी करण्याचे अभिकर्ता संस्थांना शासनाचे निर्देश.
- संभाव्य कोरोना लाटेचा धोका टाळण्यास करा लसीकरण - आयुक्त राजेश मोहिते १२ ते १७ वयोगटासाठी शाळांमध्ये केले जाणार लसीकरण
- शहरातील सायकल ट्रॅकच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशीच्या मागणीसाठी भाई अमन यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
- आपले घर डेंग्युमुक्त ठेवा आताच काळजी घेतली तर धोका टळेल मनपा प्रा.आरोग्य केंद्रात मिळणार गप्पी मासे
- राष्ट्रीय रँकिंग धनुर्विद्या स्पर्धेत मंजिरी अलोने ला सुवर्णपदक

विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता शाळा, महाविद्यालय सुरू करा.... सुरेश पाटोळे.
X
बीड (प्रतिनिधी)
कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे मागील पाच महिन्यापेक्षा जास्त काळापासून संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला आहे. सप्टेंबर महिन्यापासून बऱ्यापैकी मुभा भारतीय जनतेला सरकारकडून देण्यात आली आहे. शासकीय, खाजगी स्तरावरील अनेक सेवा,उद्योग व्यवसाय जसे की, विविध कारखाने, उद्योगबाजार, बससेवा, रेल्वे सेवा, दुकाने, हॉटेल्स, देशी दारूदुकाने, बियरबार तसेच निर्बंधासह काही सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मुभा देवून गर्दीची ठिकाणे खुले करण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र शाळा व महाविद्यालय बंदच आहेत. यामुळे देशाचे उदयाचे भविष्य असलेली आपल्या भावी पिढीचे शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा व महाविद्यालय सुरू करावीत अशी मागणी मानवी हक्क अभियान या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी केंद्र सरकार व राज्यसरकारकडे केली आहे.
देश जागतिक महासत्ता, आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर असतांना देशाचे उदयाचे भविष्य घरामध्ये डांबून ठेवणे योग्य नाही. जरी हे निर्बंध आरोग्याच्या दृष्टीने योग्य वाटत असले तरी आजच्या चालू अनलॉक प्रक्रियेतून कोरोनाच्या होणाऱ्या प्रार्दुभावामुळे सर्व जनता विध्यार्थ्यांसहित मुक्तपणे संचार करत आहेत. यात सुरक्षित अंतर, मास्कचा नियमित वापर, काही आरोग्यविषयक निर्बंध लावून शाळा, विद्यालय, कॉलेज, महाविद्यालये सुरू करावेत. विद्यार्थ्यांचे पर्यायाने राज्याचे, देशाचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान न करता काही आरोग्य विषयक बाबींची पूर्तता करून शाळा, कॉलेज, विद्यालय, महाविद्यालय सुरू करण्यासाठी आपण परवानगी दयावी असेही पत्रकार सुरेश पाटोळे यांनी सांगितले आहे.